नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*
*नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*
*●१• नागराजा - अनंत (शेष) ..*
*●२• नागराजा - वासुकी ..*
*●३• नागराजा - तक्षक ..*
*●४• नागराजा - कर्कोटक ..*
*●५• नागराजा - ऐरावत ..*
*ह्या पाचही नाग वंशीय राजांची स्वतंत्र राज्ये होती ..!!*
*ह्यामध्ये नागराजा 'अनंत' हा सर्वात मोठा ..!! जम्मू-काश्मीर मधील 'अनंतनाग' हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते ..!!*
*त्यानंतर दुसरा नागराजा 'वासुकी' होय ..!! कैलास मानसरोवर थेट पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा वासुकी प्रमुख राजा होता ..!!*
*तिसरा नागराजा 'तक्षक' .!! ह्यानेच जग-प्रसिद्ध 'तक्षशिला' विश्व-विद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, ऍरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेले ..!!*
*चौथा नागराजा 'कर्कोटक'चे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते ..!!*
*पाचवा नागराजा 'ऐरावत' ..!! (पिंगाला) भंडारा प्रांत आजही 'पिन्गालाई एरीया' म्हणून ओळखला जातो ..!!*
*ह्या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या ..!!*
*हे पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या स्मृती-प्रित्यर्थ नागवंशीय लोक "नागपंचमी" दिन दरवर्षी साजरा करीत असत ..!!*
*कालांतराने यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणा-या 🐍नागात करुन टाकले ..!!*
*त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त 'सरपटणाऱ्या 🐍 नागांची पंचमी' म्हणून ओळखला जावू लागला, आणि नागवंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली ..!!*
*आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही ..!!*
*हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटणारे सर्प नव्हेत ..!!*
*आज जरी 'नागपंचमी' ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी, त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे ..!!*