नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!
समकालीन मराठी जैन नाट्यछटा
*काय म्हणावं या मोठ्यांना*
लेखिका :प्रा सुरेखा कटारिया -राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली
मो. नं. 9822745030
------------------------------------------
सुहास काय सांगू घरात सगळं पाणी पाणी पाणीच...! इकडे तिकडे पाण्याने भरलेली भांडी...!
ही मोठी माणसं अशी कशी वागतात हेच मला कळत नाही.
आता काय झालं. काय झालं म्हणून काय विचारतो.
बाई म्हणते , "आंघोळीला पाणी कमी वापर."
तेव्हा मी बाई सांगितलं, "सिद्धपदार्थ विज्ञाना ग्रंथात कॅप्टन स्कोर्सबीने दुर्बिणीतून पाहून सिद्ध केलं आहे की एका पाण्याच्या थेंबात ३६४५० जीव असल्याचे स्वाध्यायनी कालच सांगितलेले आठवतंय .जीवाची हानी होते. आणि त्याचं पाप आपल्या माथी. .! नको रेsss बाबाssss
तेव्हा बाई म्हणते अरे निमांश, "भगवान महावीर स्वामींनी उत्तर अध्ययन सूत्रामध्ये सांगितलेला आहे.एका पाण्याच्या थेंबात अनंत जीव असतात. 2600 वर्षांपूर्वी त्यांनी सांगून ठेवलंय.
"नको रे बाबा,पाप म्हटलं की भीती वाटते."
पाणी म्हणजे जीवन. पाणी नसेल तर कसे जगू? त्यात गावाकडे दुष्काळ. ..!बाई आपलं सारखं मला सांगत असते.
" हाss ! पाणीटंचाई आहे. गावाकडे, केवढाsss दुष्काळ आहे.पाण्या शिवाय जीवन शक्य नाही.आणि त्यात आज संध्याकाळी पाणी येणार नाही. सुहास ...!बाईची ही सारखी बडबड मी ऐकतोय."
खरं सांगू का तुला, बाईच्या सांगण्यावरून मला तसं बिलकुल ही वाटत नव्हतं. कारण घरात सगळ्या पाण्याच्या हौदा बरोबर, पाण्याच्या टाक्यां बरोबर,घरातली सगळी छोटी मोठी भांडी भरून ठेवली आहेत पाण्याने...!
बाईला, सहज म्हणायला गेलो, "बाई घरात आपण सहाच माणसं! तू, मी भाऊसा, क्षितिज, दादीजी, दादाजी त्यात दादाजी- दादाजींचे आज तर बडे स्नान चे पच्चक्खान आहेत. ते तर आंघोळी करणार ही नाहीत. आणि एवढं पाणी भरून ठेवले.?
तर काय म्हणाली माहितीये, "तुला सांगते ना, गप्प बैस !"
बरं गप्प बसतो." मी लहान पडलो ना.मला मोठ्यांच ऐकलं पाहिजेत ..! "
बाई मी चांगलं सांगायला गेलो बाई आज मी हात पायच धुतो हो ...!एकच जग भर पाणी घेऊन ..!!
तर रागावून म्हणते कशी, "हो हो तुझ्याच भल्यासाठी सांगते ना? "
कळतं ना मला पाठशाळेत स्वाध्यायाजी पण सांगतात ना, पाण्याच्या एका थेंबात अनंत जीव आहेत. पाणी जपून वापरा. कळतं ना मला. शिवाय शाळेत ही कार्यानुभव च्या तासाला सर सांगतात, पाणी जपून वापरावे ,हवा तेवढा पाऊस पडत नाही. झाडांची बेसुमार व तोड त्यामुळे धरणातला पाण्याचा साठा हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे पाणी पुरवून पुरवून वापरलं पाहिजेत. पाण्याचा वापर काटकसरी न करायला हवा. अरे मी हातपाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो. तर बाई पाणी होत होती. मी मोठ्याने म्हणालो,
"बाई, अगं ss अगंsss भरलेलं पातेलं कशाला ओतून दिलस?"
अरे ते काल भरलेलं ते पाणी शिळं झालं.
" असं. ..!"
बाई काल तर तू मला व्हिडिओ दाखवला ना, पाणी कधी ही शिळ होत नाही. अन तू पाणी ओतून दिल म्हणून आपलं विचारलं. नागरिकांनी पाणी वाया घालू नये ! व्हिडिओ तू काल तर दाखवला.
"काय म्हणालीस शहाणपणा शिकवू नकोस."
नाही फक्त सांगितलं सुहास माझं तर डोकं चालत नाही. अरे शेजारचे पटेल आजोबा बादली घेऊन येत आहेत बहुधा पाणी घ्यायला. तर आई म्हणते कशी
" परत पाठव त्यांना?"
" अगं तू तर म्हणतेस शेजार धर्म पाळावा."
एक बादलीभर पाणी देण्यास काय हरकत आहे .पटेल काका बिचारे म्हातारे आहेत ना गं. तूच म्हणतेस ना सर्वांना मदत करावी.
"ते आले तर त्यांना सांग पाणी नाही."
आता अशी कशी बोलतेस? काय म्हणते, पाणी नाही...!
"मोठ्याने बडबडत. बरं! मी आपलं गप्प बसतो. बोलणे खाण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं."
बादली घेऊन आलेले पटेल काका. ..!
"कोण? पटेल काका? या काका काय पाणी हवय. छे हो आमच्याकडे तरी कुठे पाणी आहे? थोडसं भरलेलं. तेच कसं बस पुरवायचं.
काय म्हणता एवढ्या तर बादल्या, भांडे भरून ठेवलेत. संध्याकाळी पाणी येणार नाही. म्हणून भरून नको का ठेवायला ?
बरं ठीक आहे, येतो .
"गेले का पटेल काका?"
"हो, गेले गं"
" बाई, मी आंघोळीला जातो.
"पाणी जपून वापर."
"हो s हो ss गं अंघोळ अगदी बादली भर पाण्यातच करतो. अपकाय जीवांची विराधना होते. आमच्या पाठशाळेतल्या स्वाध्यायाजी सांगतात.
बरं का सुहास "बाईला विचारलं बाई अग गरम पाणी कशात घेऊ? सगळ्या बादल्या भरल्यात जग भरलेत मगे भरलेत...!"
काय म्हणते, "एका बादलीतलं पाणी ओतून दे. "
"अग बाई शेजारच्या आलेल्या पटेल आजोबांना परत पाण्याशिवाय पाठवलं आता म्हणते पाणी ओतून दे. मला तर काहीच कळत नाही .
कशी अशी ग तू..?
काय म्हणाली गप्प बस हो आई गप्प बसेन हो नाहीतर हा धपाटा आहेच वात्रट कार्टं म्हणून अगं पण हेच पाणी उद्या शिळं झालं म्हणून ओतून देशील म्हणून हो म्हटलं देऊ का त्यांना नेऊन पाणी थोडं...!