काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम श्री काव्य लेखन कार्यशाळादिनांक२१/७/२०२५.
काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम श्री काव्य लेखन कार्यशाळा
दिनांक२१/७/२०२५.
काव्य विषय : पाऊस आला
पाऊस आला
पृथ्वीवरती
वीज लख लखत
इशाऱा करती .. १
ग्रीष्म किरण
बरसे
उन्हात चातक पक्षी
पाण्यासाठी तरसे ..२
बहरे वेली
स्वच्छंदी
वातावरण सारे होई
हर्षुनी आनंदी.. ३
ढग गर्जले
धरणीवरी
पाऊस सरीवर सरी
धरणे भरी.. ४
ग्रीष्मानंतर गंध
दरवळ
मातीचा सुगंध मिळता
जाई मरगळ.. ५
हिरवा शालू
धरणीवरी
पाना फुलांची वेलबुट्टी
सुंदर भरजरी.. ६
प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे.