काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम श्री काव्य लेखन कार्यशाळादिनांक२१/७/२०२५.

काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम श्री काव्य लेखन कार्यशाळा
दिनांक२१/७/२०२५.

 काव्य विषय : पाऊस आला

पाऊस आला
पृथ्वीवरती
वीज लख लखत
इशाऱा करती .. १

ग्रीष्म किरण
बरसे 
उन्हात चातक पक्षी
पाण्यासाठी तरसे    ..२

बहरे वेली
स्वच्छंदी
वातावरण सारे होई
हर्षुनी आनंदी.. ३

ढग  गर्जले
धरणीवरी
पाऊस सरीवर सरी
धरणे भरी.. ४

ग्रीष्मानंतर गंध
दरवळ
मातीचा सुगंध मिळता
जाई मरगळ.. ५

हिरवा शालू 
धरणीवरी
पाना फुलांची वेलबुट्टी
सुंदर भरजरी.. ६

प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!