समकालीन मराठी जैन नाट्यछटा *काय म्हणावं या मोठ्यांना* लेखिका :प्रा सुरेखा कटारिया -राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली मो. नं. 9822745030 ------------------------------------------ सुहास काय सांगू घरात सगळं पाणी पाणी पाणीच...! इकडे तिकडे पाण्याने भरलेली भांडी...! ही मोठी माणसं अशी कशी वागतात हेच मला कळत नाही. आता काय झालं. काय झालं म्हणून काय विचारतो. बाई म्हणते , "आंघोळीला पाणी कमी वापर." तेव्हा मी बाई सांगितलं, "सिद्धपदार्थ विज्ञाना ग्रंथात कॅप्टन स्कोर्सबीने दुर्बिणीतून पाहून सिद्ध केलं आहे की एका पाण्याच्या थेंबात ३६४५० जीव असल्याचे स्वाध्यायनी कालच सांगितलेले आठवतंय .जीवाची हानी होते. आणि त्याचं पाप आपल्या माथी. .! नको रेsss बाबाssss तेव्हा बाई म्हणते अरे निमांश, "भगवान महावीर स्वामींनी उत्तर अध्ययन सूत्रामध्ये सांगितलेला आहे.एका पाण्याच्या थेंबात अनंत जीव असतात. 2600 वर्षांपूर्वी त्यांनी सांगून ठेवलंय. "नको रे बाबा,पाप म्हटलं की भीती वाटते." पाणी म्हण...
आजचे चिंतन दिनांक 17 5 2025 आभाळा एवढं मन इंगळे सर नमस्कार, आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन...!जीवनात आपल्या मुलांचा विवाह होऊन दोनाचे चार होणे आणि एक महत्त्वाच्या जबाबदारीतून स्वतःला पार पाडत असताना आपलं संवेदनाक्षम मन तसेच सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती व कला कलात्मकतेन जोपासलेली माणसं या भारतीय जैन संघटनेमध्ये फार मोलाची,फार महत्त्वाची...! राहुल इंगळे सर ,आपण त्याच पठडीत कार्य करत आहात.आम्हा याचा मनोमन आनंद होतो. याचीच फलश्रुती की काय...!सुंदर असा चिरंजीव सिद्धार्थ व ऋतुजा यांचा शुभविवाह, खूप उत्साहात,आनंदात पार पडला आणि त्यामध्ये आम्हास आशीर्वाद देताना आनंद झाला .भारतीय जैन संघटनेचा आजी व माजी स्टाफ हा आपल्या प्रेमळ निमंत्रणाला मान देऊन आनंदात सहभागी झाला. सर हे असं घडत नसतं त्यासाठी क्षणभर आवडणारं नातं आयुष्यभर जपायला आभाळा एवढं मोठं मन असावं लागतं..!! ते मन तुमच्याकडे आहे.सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन व आपला स्वतःचा पुरुषार्थ आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. याचा अनुभव बीजीएस मध्ये काम करणाऱ्या सेवा देणाऱ्याला आलेला आहे....
भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्यास उज्वल भविष्य...! कीर्तनकार डॉ.श्वेता राठोड चिंचवड,पुणे. आपलं वाईट चिंतणाऱ्यापासून चार पावलं लांबच राहिलेले बरं... त्या व्यक्तीशी नातं नसलेलं बरं... कारण जिथे द्वेष आहे तेथे चांगली भावना असू शकत नाही, त्या नात्याला अर्थ असू शकत नाही, ते नातं मी तर भावनेने जोडलेलं असू शकत नाही... जो आपला वाईट चिंततो तो आपला असूच शकत नाही..!! सर्वसामान्यांचा असा हा विचार परंतु भगवान महावीरांची भूमिका मूलतत्त्ववादी नव्हती तर परिवर्तनवादी होती विचार व आचार यांचं नियमन कोणी ईश्वर करत नाही तर कालमान लक्षात घेऊन ते माणसाने केलेला आहे तेव्हा कालपरत्वे त्यातील परिवर्तन हे केलंच पाहिजे त्यांनी पूर्वी खूप जंगल होते ते जंगल तोडून लोकांना राहण्यासाठी वस्ती निर्माण करण्यासाठी जागा हवी म्हणून होळीसारखे सण साजरे केले जात होते परंतु आज मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल होत आहे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे हे विचारात घेऊन असलेल्या परिस्थितीनुसार कृतीमध्ये बदल करणे कालबाह्य विचारांना फाटा देणे महत्त्वाचे एकीकडे माणूस अंतराळातील दूरवरच्या विश्वावर गरुड झेप घेऊन आपले स्वतःचे स्वामित्व प्रस...