भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्यास उज्वल भविष्य...! कीर्तनकार डॉ.श्वेता राठोड चिंचवड,पुणे.

आपलं वाईट चिंतणाऱ्यापासून चार पावलं लांबच राहिलेले बरं... त्या व्यक्तीशी नातं नसलेलं बरं... कारण जिथे द्वेष आहे तेथे चांगली भावना असू शकत नाही, त्या नात्याला अर्थ असू शकत नाही, ते नातं मी तर भावनेने जोडलेलं असू शकत नाही... जो आपला वाईट चिंततो तो आपला असूच शकत नाही..!! सर्वसामान्यांचा असा हा विचार परंतु भगवान महावीरांची भूमिका मूलतत्त्ववादी नव्हती तर परिवर्तनवादी होती विचार व आचार यांचं नियमन कोणी ईश्वर करत नाही तर कालमान लक्षात घेऊन ते माणसाने केलेला आहे तेव्हा कालपरत्वे त्यातील परिवर्तन हे केलंच पाहिजे त्यांनी पूर्वी खूप जंगल होते ते जंगल तोडून लोकांना राहण्यासाठी वस्ती निर्माण करण्यासाठी जागा हवी म्हणून होळीसारखे सण साजरे केले जात होते  परंतु आज मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल होत आहे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे हे विचारात घेऊन असलेल्या परिस्थितीनुसार कृतीमध्ये बदल करणे कालबाह्य विचारांना फाटा देणे महत्त्वाचे एकीकडे माणूस अंतराळातील दूरवरच्या विश्वावर गरुड झेप घेऊन आपले स्वतःचे स्वामित्व प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे स्वतःच्या विश्वातीलच नैसर्गिक साधन संपत्तीची नासधूस करत आहे उधळपट्टी करत आहे एवढेच नव्हे तर सुजलाम सुफलाम हिरवीगार असणारी ही धरती माता तिला जमीन दोस्त करून माणसे त्याग जागी सिमेंटची जंगले उभारत आहेत एवढेच नव्हे तर सिमेंटचे रस्ते धरणाच्या तटबंदीसाठी सुद्धा डोंगरची डोंगर उखडून दिले जात आहेत भूमातेच्या पाठीवर जणूनंगा नाच चाललेला आहे तो थांबवायचा असेल तर भगवान महावीरांच्या विचाराने आणि त्या मार्गाने जाणं खूप महत्त्वाचं
भोगवदाने जीवनात आणलेली ही विसंगती पावलोपावली आज जाणवत आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा भासत आहे ती संपुष्टात येत आहे. 
पूर्वी व आजही काही प्रमाणात मर्दमकी दाखविण्यासाठी इन्स्प्रश्‍वापदाची शिकार केली जाते वाघारी कावीळ सिंह त्यांची कातडी सोलून त्यांची असणे केली जायची घराच्या बैठकीमध्ये वाघाचे नाहीतर सिंहाचे शी लटकवून स्वतःच्या कवर्याचे आणि शौर्याचे प्रदर्शन मांडले जाते परंतु एकूणच वाढत असलेल्या प्रदूषण पर्यावरणाचा बिघडत जाणारे संतुलन याचा विचार करून आता माणसाला जाग येऊ लागली आहे आणि ती यायला हवी वन्य पशु पक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करू लागलेले आहेत नैसर्गिक साधन संपत्ती वाचावी यासाठी प्रयत्न चालू आहेत पाण्याची हवी तशी नाशदूस न करता पाणी साठवा पाणी जिरवा असे उपक्रम राबवले जाऊ लागले आहेत हे कळायला खूप उशीर झाला सव्वीसशे वर्षांपूर्वी एका महामानवाला हे उमजले उमगले अगदी दगड माती तेल पाणी वारा गारा वनस्पती वातीजोती यामध्ये पंचास्तिकाय ऊर्जा असते  हे सांगून पृथ्वी काय जल काय अग्नी काय वायु काय वनस्पती काय अशा एकेंद्रीय जीवालाही  दुखवू नका हे सांगणारे प्रथम पुरुष भगवान महावीर तसेच हिरव्या पालेभाज्या मध्ये सुद्धा जीव असतो बहु बीज असलेल्या  फळभाज्या वर्ज मानल्या या कृतीने काही प्रमाणावर जीव हत्या रोखली जाते हा महामानवाच्या मणीचा भाव तर अशाने पुण्य लागते हा व्रत करणाऱ्या मनीचा भाव .
बोलताना हळू बोला. शांततेने बोला आपले विचार आचारात आणून मग जगासमोर ठेवा.  हे जर केले नाही तर तिसरे महायुद्ध आढळ आहे हे टाळायचे असेल तर बोलण्यामध्ये नम्रता विनयता असणे महत्त्वाचे. .!
जैन साधु साध्वी बोलताना तोंडापाशी मुखवस्त्रिका लावतात. आता या करोना काळामध्ये अख्या जगाला आलेली प्रचिती...! आपल्या बोलण्यातून वायुकाय जीवाची हत्या होते. ही हत्या होऊ नये, एकमेकांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आज-काल मास्क बांधून मुखवस्त्रिकांचा वापर केला जात आहे. 
एकंदरीत भगवान महावीरांच्या तत्वांचा विचार करत जगत असताना आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर असावेत. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणे पक्के आहे. आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी  आपल्या मित्राची साथ सोडत नाही .
_जपणं आणि साठविणं यात खूप अंतर आहे. साठविली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली माणसं. जगा आणि जगू द्या हा भगवान महावीरांनी दिलेला मंत्र निश्चितच महत्त्वाचा आहे. 
. माणसाला बदलत्या परिस्थितीनुसार बदलता आलं पाहिजे. तरच जगणं सोपं बनतं.. निरोगी मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला मूर्ख सोडा पण एखादा चांगला माणूस सुद्धा फसवू शकत नाही.. शून्याला किंमत तोच व्यक्ती देतो जो कष्ट करून शून्यातून घडलेला असतो. हे भगवान  महावीरांनी जगत असताना केलेले चिंतन आजही महत्त्वाचे आहे
_* प्रामाणिकपणावर  आपल्या पुरुषार्थावर निसंकोच विश्वास ठेवा, मन मनगट व मेंदू याचा सकारात्मक उपयोग करा योग्य वेळ आली की जे हवं ते मिळणार, मग मागायला काहीच उरणार नाही...!
. आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं जगायचं ते शिकवतात... तेच भगवान महावीरांनी आपल्या जगण्यातून सांगितले आहे, म्हणून माणसाचं मोल   प्राणिमात्रांचे मोल वनस्पती समोर जीव अजीवाच मोल आयुष्यात  खूप महत्त्वाचे असते... मग ते येणारे असोत की जाणारे.!!
. जसे पेराल तसेच उगवेल या कर्म सिद्धांतावर नितांत श्रद्धा ठेवा .दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं चांगलं होईल ही अपेक्षा कधीच करू नका. 
. आयुष्यात खूप चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एका गोष्टीचा नक्की आहे... आज पर्यंत स्वतःच्या फायद्यासाठी कोणाला पीडा न देता त्याच्या मनाचा विचार करण महत्त्वाच. ..! 
. जेवढ्या श्रद्धेने तुम्ही तुमच्या भावनेची, स्वतःच्या विचारांची प्रतारणा करून पूजा करता. तेवढीच पूजा  करून आई वडिलांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य सर्वांनी पार पाडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. 
जैन दर्शनातील अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह या पाच व त्यांना आचारधर्मातील मुल पायाभूत प्रति मानली गेलेली आहेत चारित्र्यसंवर्धनासाठी व आत्मसंयमासाठी ही पाच व्रते मानव जातीला उपकार ठरतात साधुसंतांनी ही व्रते अधिक काटेकोरपणे पाळायचे असल्याने त्यांच्यासाठी ही मावळते ठरतात तर संसारी स्त्री पुरुषांसाठी श्रावक श्राविकांसाठी त्यांच्या संसारी जीवनाच्या मर्यादित काही प्रमाणावर स्थूल मानाने पाळावयाची असल्याने ती अणुव्रते असतात. 
.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन