आजचे चिंतन दिनांक 17 5 2025 आभाळा एवढं मन इंगळे सर नमस्कार, आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन...!जीवनात आपल्या मुलांचा विवाह होऊन दोनाचे चार होणे आणि एक महत्त्वाच्या जबाबदारीतून स्वतःला पार पाडत असताना आपलं संवेदनाक्षम मन तसेच सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती व कला कलात्मकतेन जोपासलेली माणसं या भारतीय जैन संघटनेमध्ये फार मोलाची,फार महत्त्वाची...! राहुल इंगळे सर ,आपण त्याच पठडीत कार्य करत आहात.आम्हा याचा मनोमन आनंद होतो. याचीच फलश्रुती की काय...!सुंदर असा चिरंजीव सिद्धार्थ व ऋतुजा यांचा शुभविवाह, खूप उत्साहात,आनंदात पार पडला आणि त्यामध्ये आम्हास आशीर्वाद देताना आनंद झाला .भारतीय जैन संघटनेचा आजी व माजी स्टाफ हा आपल्या प्रेमळ निमंत्रणाला मान देऊन आनंदात सहभागी झाला. सर हे असं घडत नसतं त्यासाठी क्षणभर आवडणारं नातं आयुष्यभर जपायला आभाळा एवढं मोठं मन असावं लागतं..!! ते मन तुमच्याकडे आहे.सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन व आपला स्वतःचा पुरुषार्थ आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. याचा अनुभव बीजीएस मध्ये काम करणाऱ्या सेवा देणाऱ्याला आलेला आहे....
समकालीन मराठी जैन नाट्यछटा *काय म्हणावं या मोठ्यांना* लेखिका :प्रा सुरेखा कटारिया -राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली मो. नं. 9822745030 ------------------------------------------ सुहास काय सांगू घरात सगळं पाणी पाणी पाणीच...! इकडे तिकडे पाण्याने भरलेली भांडी...! ही मोठी माणसं अशी कशी वागतात हेच मला कळत नाही. आता काय झालं. काय झालं म्हणून काय विचारतो. बाई म्हणते , "आंघोळीला पाणी कमी वापर." तेव्हा मी बाई सांगितलं, "सिद्धपदार्थ विज्ञाना ग्रंथात कॅप्टन स्कोर्सबीने दुर्बिणीतून पाहून सिद्ध केलं आहे की एका पाण्याच्या थेंबात ३६४५० जीव असल्याचे स्वाध्यायनी कालच सांगितलेले आठवतंय .जीवाची हानी होते. आणि त्याचं पाप आपल्या माथी. .! नको रेsss बाबाssss तेव्हा बाई म्हणते अरे निमांश, "भगवान महावीर स्वामींनी उत्तर अध्ययन सूत्रामध्ये सांगितलेला आहे.एका पाण्याच्या थेंबात अनंत जीव असतात. 2600 वर्षांपूर्वी त्यांनी सांगून ठेवलंय. "नको रे बाबा,पाप म्हटलं की भीती वाटते." पाणी म्हण...