वटपौर्णिमा..

लेख खूप धारिष्ट करून लिहीलाय.
नक्की प्रतिक्रिया द्या. 

वटपौर्णिमा..

आज वटपौर्णिमा, विवाह झाल्यावर घरचे वरिष्ठ म्हणजे सासू सासरे, जावू सारे बोलू लागले. आज पहिलाच वडाचा ओवसा आहे माझा. सारं ओवश्याचं समान सामग्री आदल्या दिवशी घरी हजर होतं. मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले. ओवसा आणि तो दिवस पार पडला. उपास सुद्धा केला; पण हा सण आपण का साजरा करतो ? केवळ परंपरा म्हणून की अजून काही. कोणे एके काळी सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले म्हणून !! पण तिचे सत्यवानावर अतोनात प्रेम होते म्हणून !! पण मग आपण का याची रेघ ओढत पुढे नेतोय. आणि खरंच आपण हे केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते का ? असे पाहिले तर खुपशा स्त्रिया नवऱ्याच्या मृत्यूनंतर खूप जगत असतात. 
   नंतर काही बाही वचनात आलं की वड वृक्ष खूप प्रमाणात ऑक्सिजन सोडतो आणि तो मिळावा म्हणून बायका वडाची पूजा करायला जातात. त्यानिमित्त त्या वधाच्या संपर्कात येऊन त्यांना भरपूर ऑक्सिजन मिळेल.प्रश्न माझ्या मनात असा उपस्थित होतो. वर्षातून काही क्षण वडाला जाऊन मिळणारा ऑक्सिजन पुरेसा आहे का ? त्याकाळी पुरुष वर्ग कामानिमित्त बाहेर पडत. रात्री जेवण झाले की पारावर जाऊन बसत त्यांना खूप ऑक्सिजन मिळत होता पण स्त्रीयांना नाही. 
   काही वर्षापूर्वी एक प्रश्न मनात उपस्थित झाला की एका स्त्रीच्या ताकदीने नवऱ्याचे प्राण वाचले म्हणून आभार पुरुषांनी आपल्या बायकोचे मानून हा सोहोळा पुरुषांकडून साजरा व्हायला हवा होता स्त्रीच्या सन्मानार्थ. म्हणून काही वर्षापूर्वी फेसबुक समूहावर एक साधं वाक्य टाकलं की "स्त्रीच्या ताकदीने नवऱ्याचे प्राण वाचले म्हणून हा सोहोळा पुरुषांकडून साजरा व्हायला हवा होता" त्यावर खूप स्त्रियांची सकारात्मक प्रतिक्रिया आल्या; पण काही खोचक पुरुषवर्ग बोलून गेला " मॅडम तुम्ही तुमच्या नवऱ्याला वट सत्यवान करायला लावा" 
"भारीच आगावू बाई. धर्म गुंडाळला चाललीय" वैगरे अश्या खूप.
मी धर्म गुंडाळत नव्हते तर स्त्रियांवर लादलेल्या ह्या रूढी जर सत्य आहेत. वैद्य आहेत; तर बायकोआधी पुरुष मरतो कसा ? धर्म म्हणून देवांची पूजा मान्य पण आपल्याच नवरा म्हणणाऱ्या सोबतीची पूजा !! पटले नाही म्हणून फेसबुकवर एक वाक्याची पोस्ट टाकली एवढेच; पण केवढा ऊहापोह. कविता वालावलकर ही एक साहित्यिक साऊथ इंडियन मैत्रीण तिच्याकडून छान प्रतिक्रिया आली. की हा सण आमच्याकडे स्त्रीपुरूष मिळून दोघेही साजरा करतात. पुरुष पण पूजा आणि उपास करतात. प्रतिक्रिया खूप समाधानकारक वाटली. स्त्रीचा सन्मान करणारी वाटली.
   आज वटपौर्णिमा. ज्या भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देऊन बुद्धिवान केले. त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून नक्कीच विचार करावा. आज नोकरीदार महिला सुद्धा वेळ मिळत नाही तरी ॲडजेस्टमेन म्हणून फांदी छाटून घरी आणून पूजा करतात. ही पर्यावरण हानी नव्हे का ? अशी पूजा केली जाते का ? वडाची पूजा जरूर करा कारण तो माणसाला खूपकाही देतो म्हणून. तशी आपण तुळस, गाय ची सुद्धा पूजा करतो. आपण दगडाला देव मानणारी श्रद्धाळू माणसं आहोत. बरं रूढी म्हणून 
खूप सऱ्या बायका नाटतांत. Fb, whatapp वर  फोटो दाखवतात. त्यासाठी वटसावित्रीचा अट्टाहास का ? काय आहे हे ? आता जे सावित्रीचे जागोजागी पेव फुटलेले दिसतेय ते दिखाऊकरण नव्हे का ? एवढ्या सर्व रितीभाती सांभाळून सोडचिठ्ठी प्रकरण समाजात अधिक बळावत चालले आहे ते वेगळेच

कल्पना दिलीप म्हापूसकर

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड