आजचे चिंतन- ना उरे आशा न उरे तृष्णा... माझी बाई

*आजचे चिंतन*

15/4/2023

*ना उरे  आशा न उरे तृष्णा...!*
बाई, तुला सुरेखाचं नमन, वंदन... 👏
भिगवनहून आले आणि मनात अनेक विचारांचा काहून दाटलं. 
  बाईच्या वर्ष  तपच 18 व पारण नगर येथे परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज साहेब, परमपूज्य डॉ अलोक ऋषीचे महाराज साहेब  आदी ठाणा यांच्या सानिध्यात होत आहे. त्यानिमित्ताने आमची आई पद्माबाई गौतमचंदजी रायसोनी यांच्या सहवासातील काही अनुभव कथन
कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होतात... अगदी तसेच फक्त तुझ्या सहवासात राहिल्यावर नकळत विचार देखील स्वच्छ होऊन जातात...!!
. आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो... कुठलंच नातं हे ठरवून जोडलं जात नाही... ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया व प्रेम हे फार दुर्मिळ असतं... हे दान ज्याला लाभलं, त्यालाच त्यातला खरा आनंद उपभोगता येतो. बाई हे  तुझ्या कृतीतून दाखवून दिल. 
. कभी खुशियों की धूप, कभी दर्द की छांव..!
कभी जीत की आशा कभी हार से निराशा...!
बस यही है जिंदगी की छोटी परिभाषा...!!
. तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझी तपस्या, तुझं निर्विकारी राहणं. आम्हा सर्वांना सांगून जात. *विचारवंत होऊ नका आचारवंत व्हा..*!!
 तुझं साधं राहणं. साधेपणा हे सगळ्यात चांगलं सौंदर्य आहे.. क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे... हे तूच आम्हाला तुझ्या कृतीतून दाखवून दिलं. 
विनम्रता हा सगळ्यात श्रेष्ठ स्वभावाचे व आपुलकी आणि आपलेपणा हा सर्वात श्रेष्ठ नातं आहे. समभाव राहून तू आम्हाला संस्काराचे संस्करण दिलं. 
 माणूस समजून घेणं कठीण असतं तेंव्हा परिस्थिती समजून घ्यावी..हे तुच तुझ्या आचरणातून दाखवलं. 
तुझं प्रत्येकाशी प्रेमाने वागणं बरच काही सांगून जातं.इतके लहान व्हा की प्रत्येक जण तुमच्याबरोबर बसू शकेल.... इतके मोठे व्हा की जेंव्हा तुम्ही उभे राहाल तेंव्हा कोणीच बसलेला नसेल..!!
घाई एवढी पण नसावी की जगायचं  राहून जाईल... आणि उशीर पण एवढा नको की इच्छा अपूर्ण राहील. गेली 18 वर्ष चाललेलं तुझं वर्ष तप आम्हाला खूप काही सांगून गेलं. संसारात राहूनही विरक्त जीवन कसं जगावं हे तुझं जगणं सांगून जात. स्वर्गीय रवींद्र गेल्यापासून अधिकच विरक्तपणा तुझ्या मध्ये दिसून येतो. भगवान महावीरांनी दिलेला संदेश तू आचरणात आणताना आम्हाला सुद्धा  तुझ्याकडे तुझ्या आचरणाकडे पाहून तसं जगण्याची उर्मी येते. 
तू नेहमी कृतीतून सांगत आले आहेस.रस्त्यावर पडलेल्या वाळलेल्या पानावर हळुवारपणे चाला.... कारण ती तीच पाने आहेत ज्या झाडाच्या आश्रयाने तुम्ही मोठे झालेले असतात.
. आवडतं ते करू नका... जे करावंच लागतं त्यात आवड निर्माण करा. 

जमा करून ठेवायचे असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करा.. कोणाचा तळतळाट नको... तुझं ध्यान जात ते तुझं सर्वांशी प्रेमाने वागणं सुना, नातू, नाती, मुलींना व समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करणे आम्हाला खूप काही शिकवून जातं. करण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही.  तू नेहमी सांगतेस जीवनात फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवा ...*मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा*!! आणि या दोन्हींमध्ये आपल्याला खूप समाधान मिळेल.
             चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायमच आठवणीत असतात...  बाई अगदी तुझ्यासारखं...
*तुझी मुलं* 
*बसंती, सुरेखा, प्रकाश, बेबी, दिलीप, उमाकांत, शैला व सर्व नातसूना, नातू ,परतोंड*

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड