नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!
समकालीन मराठी जैन नाट्यछटा *काय म्हणावं या मोठ्यांना* लेखिका :प्रा सुरेखा कटारिया -राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली मो. नं. 9822745030 ------------------------------------------ सुहास काय सांगू घरात सगळं पाणी पाणी पाणीच...! इकडे तिकडे पाण्याने भरलेली भांडी...! ही मोठी माणसं अशी कशी वागतात हेच मला कळत नाही. आता काय झालं. काय झालं म्हणून काय विचारतो. बाई म्हणते , "आंघोळीला पाणी कमी वापर." तेव्हा मी बाई सांगितलं, "सिद्धपदार्थ विज्ञाना ग्रंथात कॅप्टन स्कोर्सबीने दुर्बिणीतून पाहून सिद्ध केलं आहे की एका पाण्याच्या थेंबात ३६४५० जीव असल्याचे स्वाध्यायनी कालच सांगितलेले आठवतंय .जीवाची हानी होते. आणि त्याचं पाप आपल्या माथी. .! नको रेsss बाबाssss तेव्हा बाई म्हणते अरे निमांश, "भगवान महावीर स्वामींनी उत्तर अध्ययन सूत्रामध्ये सांगितलेला आहे.एका पाण्याच्या थेंबात अनंत जीव असतात. 2600 वर्षांपूर्वी त्यांनी सांगून ठेवलंय. "नको रे बाबा,पाप म्हटलं की भीती वाटते." पाणी म्हण...