विषय : दिशाहीन युवाशक्ती कविता : धरलं तर चावतय*
*काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम सामा. काव्यलेखन*
*दि.८/७/२५*
*विषय : दिशाहीन युवाशक्ती*
*शीर्षक : धरलं तर चावतय*
स्वच्छंदीपणाचे वाहती वारे
दिशाहीन युवाशक्ती झोक्यात
मनामध्ये सावळा गोंधळ
जगणे त्यांचे येती गोत्यात..१
भावनांचा नको तो पसारा
व्यसनांचे वाढत आहे वेड
पडसाद पडतात घरी दारी
संसारात निर्माण होई तेढ.. २
धरून ठेवलं तर चावी
सोडलं तर पळून जाईल
भरकटलेली तरुण पिढी
अशीच आहे ही तरुणाई.. ३
आधुनिक जीवनशैलीमुळे
संवाद एकमेकाचा संपला
सदा एकल कोंडे होऊन
मनो रुग्णा मध्ये गुंफला.. ४
स्वप्न पाहतात हे उंच उंच
कधीमधी घेतात हे भरारी
नसे आत्मिक अविष्कार
येतात डुलत डुलत घरी.. ५
तू..तू..मी..मी..मध्येच
नातेगोते अडकले सारे
संपला प्रेमाचा पाझर
स्वैराचाराचे वाही वारे ..४
आजच्या युवा पिढीने
मोठ्याचा ठेवावा आदर
जगावे बिन धास्तपणे
घेत मोठ्यांची प्रेमचादर.. ५
प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे ३३